एटीएम ची रांग आणि रिक्षावाले दादा!!
एटीएम ची रांग आणि रिक्षावाले दादा!! अशीच एक निवांत संध्याकाळ होती, पाई फिरायला निघालो असताना वाटेत एक एटीएम लागले. एटीएम दिसताक्षणी खर्चाच्या आठवणी जाग्या झाल्या आणि पाय आपोआप त्या दिशेला वळाले! रांगेत उभे असताना एक रिक्षावाले दादा माझ्यासमोर उभे होते. वय साधारण ३४-३५ असेल. कानात हेडफोन आणि समोरच्या माणसाकडे लक्ष की कधी बाहेर येतो. मग त्यांचा नंबर लागला आणि ते पैसे काढण्यासाठी आत गेले आणि २-३ मिनिटात बाहेर आले. बाहेर आल्यावर पटकन रिक्षा काढली आणि निघून गेले! मी आत गेलो पैसे काढण्यासाठी. आत गेल्यावर असे लक्षात आले की ते दादा त्यांची पेमेंट रिसीट विसरून गेले होते. सहज हातात घेतली तर दिसले की काढण्यात आलेल्या पैश्यांची रक्कम ही ₹२०० होती आणि शिल्लक असलेली रक्कम ही ₹५०० होती. एक सेकंद डोके आणि मन दोन्ही सुन्न झाले आणि मन भरून आले की रिक्षावाले दादा त्या ₹२०० मध्ये काय करणार होते? त्यांचे २०० मध्ये सगळं भागेल का? आपण तर ₹५००० काढायला इथे आलो होतो. आपल्याला इतक्या पैश्यांची खरच गरज आहे का? आपण इतके पैसे का काढतो आहोत? अवास्तव गरजा आणि नको त्या चैनी पूर्ण करण्यासाठी का?? खरच आपल्याला इतके